सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अणि श्रावणबाळ राज्य निवृत्तीयोजना दरवर्षीप्रमाणे हयात दाखले संबधित ऑफ़िस मध्ये स्विकारले जातात, पण ह्यावर्षी त्या सोबत 21000/ उत्पन्न दाखला जोडण्यात यावा असे परिपत्रक शासनाने काढले आहे, हीअट ताबडतोब रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले, त्या वेळी GK मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्थेचे संतोष गायकवाड, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे , संस्थेचे सचिव वैजिनाथ बिराजदार, महेश उंबरगीकर, ज्ञानेश्वर पवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहर कार्यालय व उत्तर तहसिल कार्यालय येथे संजय गांधी निराधार , श्रावणबाळ राज्यनिवृत्ती योजना दरवर्षी प्रमाणे मी हयात आहे हे दाखले आहे . संबंधित ऑफिस मध्ये किंवा विविध बँकामध्ये स्विकारले जातात . पण या वर्षी हयात दाखल्यासोबत रु .२१००० / - उत्पन्न दाखला हा जोडण्यात यावा असे परिपत्रक काढून लाभार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे . एकतर दरमहा रु .१००० / - पेन्शन या लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी कमी पडतात . त्यात त्यांच्या कुठल्याही गरजा भागवले जात नाही . अशा मध्ये आज सोलापूर शहराचे तापमान ४२ ते ४३ अंश असताना दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणी घराबाहेर पडू नये असे हवामान खात्याने सांगीतले आहे . असे असताना या जेष्ठ वृध्द निराधार महिला यांना रु .२१००० / - उत्पन्न दाखला जोडा , तसे नाही केल्यास ३ महिन्यानंतर आपले अनुदान बंद करण्यात येईल असे आदेश देत आहात .
उत्पन्न दाखला काढताना संबंधित तहसिलदार यांची नोंद घेवून त्यावर जावक क्रमांक टाकून तो दाखला मंडल अधिकारी यांचेकडे घेवून जायाचे आहे . सर्व चौकशी करुन जर त्यांचे उत्पन्न रु .२१००० / - असेल तर तो दाखला देण्यात येतो . या योजनेचे नवीन प्रकरण सादर करताना त्यामध्ये रु .२१००० / - उत्पन्न दाखला हाजोडलेला असतो . त्यावरुन हे प्रकरण मंजूर होतात . असे असताना हयात फॉर्म बरोबर रु . २१००० / - उत्पन्न दाखला का जाडायचा ? हा सर्व आटापिटा करताना हे लाभार्थी वृध्द आहेत , याना बी.पी. शुगरचा व इतरही काही आजार आजार आहेत , एकतर अधिकारी वेळेवर भेटत नसतात . जो काय त्यांना छोटा रोजगार असेल तो त्यांना मिळत नाही . त्यात काम ही होत नाही . एक - एक लाभार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही . त्यामुळे सदरची सर्व परिस्थिती आपल्या निदर्शनास जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने आपल्या निदर्शनास आणुन दिला आहे . आपण ताबडतोब पुर्वीप्रमाणे फक्त तलाठी हयात दाखले संबंधित ऑफिसला तात्काळ लेखी स्वरुपात आदेश देवून पुर्वीप्रमाणे हयात दाखले घेण्यात यावे . तसेच वृध्द जेष्ठ नागरीक , निराधार महिलांच्या हे दाखले काढताना त्यांच्या जिवीतास काही धोका झाल्यास त्यास आपले प्रशासन सर्वस्वी जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी . अन्यथा या जेष्ठ निराधार महिला यांना घेवून आपल्या ऑफिस समोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल . होणान्या परिणामास आपले सर्व प्रशासन जबाबदार राहीन , याची आपण दखल घ्यावी आणि ताबडतोब हा आदेश रद्द करण्यात यावा. अशी मागणी चे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment