सारा न्यूज नेटवर्क-
सोलापूर (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २०.०८.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे. सदर योजनेतील ५० वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडी अडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील ५० वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो ५ वर्षांतून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment