सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे श्रमगौरवमूर्तीचा सन्मान व सहयोग शिधावाटप..
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूर संस्थेच्या वतीने काल दिनांक १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या निमित्ताने श्रमगौरवमूर्तीचा सन्मान आणि सहयोग शिधावाटप करण्यात आले..
या कार्यक्रमाला डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी हे अध्यक्ष म्हणून लाभले, तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त पीएसआय माननीय श्री अनिल उकरंडे सर हे होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापिका अध्यक्षा सौ. प्रांजली मोहीकर यांनी केले. प्रास्ताविकतेमध्ये संस्थेचे विविध उद्दिष्टे सांगून त्यांनी कामगारांच्या जीवनातील संघर्ष ओळखून अनेक गरजूंना धान्य वाटप आणि जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न करत आहोत असे मनोगत व्यक्त केले.. भडकुंबे सर आणि संस्थेतील सदस्य या सर्वांनी मिळून "महाराष्ट्र गीत" सादर केले.. यानंतर विविध क्षेत्रात मोलमजुरी करणारे पण अतिशय गरीब आणि गरजू असलेले असे सहा जणांचा श्रम गौरव मूर्ती म्हणून सन्मान करण्यात आला व शिधा वाटप करण्यात आले... या उपक्रमासाठी सहयोग दातार सौ.अश्विनी कुंभार, श्री धनंजय माने श्री सुहास भोसले, श्री गोरख शेठ चौधरी, प्रा श्री प्रेमचंद मेने सौ ज्योती मेने, श्री शैलेश मोहीकर, सौ प्रांजली मोहीकर आदी व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले...
एकूण 96 किलो धान्य जमा झाले होते यामध्ये गहू ज्वारी रवा साखर, तसेच जीवनावश्यक वस्तू खाद्यतेल, गुळाची ढेप, आंघोळीचे साबण कपड्याचे साबण खोबरेल तेलाची बाटली दूध ब्रश टूथपेस्ट डोक्याला बांधायचे मोठे गमचे इत्यादी सर्व वस्तू पुढील सहा गरजूंना देण्यात आले.श्री भागांना परसप्पा कोळी, श्री मनोहर माने, श्री ज्ञानदेव वाघमारे, श्री रवी वीर, श्री शिवाजी राजगुरू, श्री अनिल बोराडे यांना संस्थेद्वारे शिधावाटप आणि गरजू वस्तू देण्यात आल्या.
यानंतर माननीय श्री सुहास भोसले सर, श्री उकरंडे सर, सौ ज्योती मेने आदींनी त्यांची मनोगते व्यक्त केली..
या कार्यक्रमाला महा एनजीओ फेडरेशनचे सोलापूर जिल्हा समन्वयक माननीय श्री मनोज देवकर तसेच सामाजिक कार्याला वाहून घेतलेले तांबोळी चाचा, श्री आकाश कनकी, डॉ. सौ. आशालता जगताप, लेखिका सौ. माया बदनोरे, श्रीमती निकम ताई, श्री व सौ अग्निहोत्री, श्री. राजेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
"जिंदगी की यही रीत है हार के बाद भी जीत है" या सुंदर गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिद्धार्थ भडकुंबे तसेच सुहास भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुहास भोसले यांनी व्यक्त केले...
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment