सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून बाहेर पडत असतानाच त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर दोन युवक आडवे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली पालकमंत्री न्याय द्या..., न्याय द्या... असे म्हणून ते आडवे पडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्यांना बाजूला सरकवत ताब्यात घेतले.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिजीत कटके याची पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की मोहोळ तालुक्यातील तांबोळी या गावातील आमच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे ते अतिक्रमण हटवले जात नाही. त्यांना गावातील ग्रामसेवक सहकार्य करतो याबाबत आम्ही जिल्हा परिषदेकडे मागणी केली असता आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही पालकमंत्र्याच्या गाडीच्या आडवे येऊन न्याय मागितला.
No comments:
Post a Comment