Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, January 27, 2023

सोलापूर शहर व जिल्हा विषारी ताडी दुकाने बंद करा ह्यूमन राइट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हाधिकारी ला निवेदन


27 जानेवारी 2023 :सोलापूर (प्रतिनिधी) :
सोलापूर शहर व जिल्ह्यात विडी कामगार व यंत्रमाग कामगार वर्ग राहतो.
 सोलापूर शहर व जिल्ह्यात विषारी ताडी पिऊन गेल्या अनेक वर्षांपासून विडी कामगार व यंत्रमाग कामगारांचा मृत्यू झाला आहे
 आजच्या परिस्थितीवर नजर टाकली तर सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात (क्लोरल हायड्रेट) केमिकल युक्त विषारी ताडी धंदे सुरू आहे.

त्यामुळे शासनमान्य ताडी दुकानामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांनी ताडीचे नमुद घेऊन प्रयोगशाळेला पाठवून त्यात क्लोरल हायड्रेड नावाचे मिश्रण केले आहे. की कसे याबाबत त्यांनी शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून त्याबाबतचा अहवाल त्यांनी रेकॉर्डला ठेवणे गरजेचे आहे. असे असताना अन्न औषध प्रशासन याकामी कुठल्याही प्रकारचे ताडीचे सॅम्पल न घेता आर्थिक लाभ घेऊन अशा व्यवसायाला चालना देत आहे. दि. 18/01/2022 रोजी अशोक चौक, सोलापूर याठिकाणी साई दस्तगीर बाबू म्हेत्रे या नावाची व्यक्ति ताडी प्राशन करून मरण पावलेला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासुन विडो कामगार आणि यंत्रमाग कामागारा ताडीचे व्यसन करून मृत्य होत आहे. त्याचबरोबर अनेक गोरगरिबांचे घरात मोठे नुकसान होत आहे. तरी वरील प्रकरणाची योग्य ते चौकशी करून व अहवाल मागवून संबंधीत खात्यावर कारवाई व्हावी व त्याच बरोबर सोलापूर शहर जिल्ह्यात विषारी ताडी दुकाने बंद करण्यात यावे त्यासाठी आज ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रादौरे तक्रार करण्यात आली आहे . 
त्यावेळी ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख, माहिती अधिकार महासंघ चे सोलापूर प्रचारक बाळकृष्ण सदाफुले, माहिती अधिकार महासंघ चे कार्यकर्ते त्याचा पदाधिकारी श्रीकांत कोळी , सामाजिक कार्यकर्ते इमरान हवालदार उपस्थित होते .
त्यावेळी माध्यमांशी बोलताना ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सादिक शेख म्हणाले सोलापूर शहर व जिल्ह्यात लवकरात लवकर विषारी ताडी येणाऱ्या काळात बंद नाही झाली तर रस्त्यावर उतरून हजारो  कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करणार आणि जे पर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात विषारी ताडी दुकाने व धंदेवाण बंद होत नाही तोपर्यंत हे लढा चालू राहणार त्याचबरोबर  अधिक माहिती देताना म्हणाले सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक गरीब पीडीत वंचितांच्या न्याय हक्कांसाठी रात्रंदिवस हे ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून काम करणार आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचारच्या विरोधात हे लढा चालू राहणार सोलापूर शहर सह जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार ला आळा घालण्यासाठी मंत्रालय व त्याचबरोबर भारताचे मोठमोठे मंत्री व शासन दरबारी पत्र द्वारे तक्रार करून व आंदोलन उपोषण करून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार च्या विरोधात काम करत राहणार . भारताच्या घटनेनुसार मानवाधिकारची जनजागृती करून समाजात मानव अधिकार काय आहे या संदर्भात लोकांसमोर जाऊन मानव अधिकार च्या संदर्भात प्रचार-प्रसार करणार.

No comments:

Post a Comment