सारा न्यूज नेटवर्क -
सापाच्या अंड्यांना कृतीमरित्या बल्ब लावून दिली ऊब;
४७ दिवसानी दिला १३ पिल्लांनी जन्म;
सर्पमित्र विनोद गायकवाड,रवी जाधव यांची कामगिरी..
सोलापूर (सोलापूर) :- लिमयेवाडी येथे १५ सापाची अंडी सापडली. ती नष्ट न करता वन विभाग व वन्यजीवप्रेमींनी ती जगवायचे ठरविले. १५ अंड्यांना बल्बच्या माध्यमातून उब दिली. ४७ दिवसांनंतर १३ पिल्लांनी जन्म घेतला.
वन विभाग व नाग फाउंडेशनच्या वतीने १३ सापांच्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. २७ जून रोजी नाग फाउंडेशनचे उपाध्यक्ष सर्पमित्र विनोद गायकवाड यांना लिमयेवडी येथील नागरिक रामचंद्र नवगिरे यांनी त्यांच्या घरामध्ये अंडी असल्याची माहिती मिळाली. विनोद यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना ही अंडी सापाची असावीत, असा संशय आला. तेथील उपस्थितांनी ही अंडी नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तसे होऊ न देता गायकवाड यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना घटनेची माहिती दिली.
सापडलेली अंडी सापाचीच असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, कोणत्या सापाची असतील, हे अस्पष्ट होते. त्यामुळे सर्पमित्र राहुल शिंदे व सोलापूर वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या अंड्यांना कृत्रिमरीत्या उबविण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि ४७ दिवसांनी पिल्ले बाहेर पडली. ही पिल्ले गवत्या या बिनविषारी सापाची होती. गायकवाड व रवी जाधव यांनी सापाच्या अंड्यांची काळजी घेतली.
उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक श्रीशैल पाटील, राहुल शिंदे, नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, रवी जाधव आदींनी या अनोख्या प्रयोगासाठी परिश्रम घेतले.
वन विभाग, वन्यजीव प्रेमींच्या प्रयत्नाला यश -
"अंड्यातून बाहेर येण्यासाठी अशी दिली ऊब"
अंड्यांसाठी आर्द्रता पातळी राखणे गरजेचे असते. त्याकरिता माती ऐवजी कोकोपीटचा (नारळाच्या सालीचा भुगा) वापर करण्यात आला.
एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये अर्धा किलो कोकोपीट,पालापाचोळा यांचे मिश्रण करून त्यामध्ये अंडी ठेवण्यात आली. या बॉक्सवर एक बल्ब लावण्यात आला.
अंड्यांना मुंग्या लागू नये, याकरिता विशेष काळजी घेण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment