सारा न्यूज नेटवर्क -
पुणे (प्रतिनिधी) :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांच्या नेतृत्वखाली सर्व समाज बांधव व भगिनी यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने चालु आहे. या साखळी उपोषणाला संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ आत्माराम संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य समाज बांधव व भगिनिंच्या वतीने जाहीर पाठींबा दिला आहे. गुरुवार दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थळ वडगांव बुद्रुक पुणे या ठिकाणी सकल मराठा समाज यांना निवेदन देवून हा पाठींबा दिला आहे. या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. सध्याच्या घडीला राज्यात मराठा आरक्षण मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत. गरीब मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळणे व त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील व देशातील मराठा समाज बांधवांकडून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.
या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात येत असलेली मागणी त्वरीत मंजूर करावी. मराठा समाजाला योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य सचिव देवप्पा शिंदे व समाज बांधव यांच्या वतीने निवेदन देऊन पाठिंबा जाहिर करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment