सारा न्यूज नेटवर्क -
GIB फाउंडेशन कडून तहानलेल्या वन्यजीवांसाठी बारा हजार लिटर पाण्याची सोय..
सोलापूर(प्रतिनिधी) :- सध्या सोलापूरात सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. त्याचबरोबर पाण्याची टंचाई देखील भासत आहे. शासनाने आपल्यासाठी पाणीटंचाई आराखडा केला असून वाड्या वस्त्यांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजना राबवली जात आहे. परंतु अभयारण्य आणि माळरानावरील लहान-मोठी तलावे उन्हाने आटल्यामुळे वन्य जीवांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पाण्याच्या शोधात अभयारण्यातील वन्यजीव वाड्या-वस्त्या आणि शहराकडे धावत येत आहेत. परिणामी वन्यजीवांचे रस्ते अपघात, भटक्या कुत्र्यांचे हल्ले यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
सोलापूरची जी आय बी फाउंडेशन ही संस्था वन्यजीव संरक्षण संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून माळढोक पक्षी अभयारण्याच्या सुरक्षित ठिकाणी वन्यजीवांसाठी टॅंकरने पाण्याची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
माळढोक पक्षी अभयारण्य कार्यक्षेत्रामध्ये वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.या कृत्रिम पाणवठ्यामधे संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर यांनी स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून दिले. या प्रसंगी श्री राजकुमार कोळी ,श्री शिवकुमार मोरे यांनी परीश्रम घेतले. पुढील दोन महिन्यांत आणखी पाण्याची उपलब्धता करण्यात येणार आहे. संस्थेच्या विविध कार्यात सहभागी होण्यासाठी 7083460066 , 9850778164 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment