सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत राज्यातील 34 जिल्हा परिषद मधील गट क मधील सरळ सेवेची जवळ जवळ 19460 इतके पद भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून परीक्षा शुल्क एका जागेसाठी ओपन प्रवर्ग 1000/₹तर मागास वर्गीय अर्जदारस 900/₹ अशा पद्धतीने शुल्क आकारण्यात आले असून ही परीक्षा फी जास्त असून सुशिक्षित बेरोजगारांना ना परवाडणारी आहे एकीकडे शासनाच्या माध्यमातून वेगवेगळया जाहीराती करून जनतेचा पुळका असल्याचे दाखवायचे आणी दुसरीकडे भरती मध्ये फि वाढवायची आणी बेरोजगाराच्या गळ्याला फास लावण्याचे काम हे सरकार करीत असून महाविकास आघाडी च्या काळात S T मध्ये भरती प्रक्रियेत 600₹ शुल्क होते तर हेच विरोधक किती ओरडत होते आणी या सरकारच्या काळात 21 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता की लोकसेवा आयोगाच्या काक्षेबाहेरील गट ब क आणी ड संवर्गातील पदाच्या भरतीसाठी T C S आणि आय बी पी एस अशा दोन कंपनीची निवड जिल्हा परिषदची भरती प्रकिया राबवणार असून कंपनीच्या दर पत्रकानुसार पाच लाख हुन अधिक विध्यार्थी असल्यास 495/₹ प्रमाणे शुल्क अकरले जाणार आहे या शिवाय संबंधित प्रशासकीय खर्च भागवीन्यसाठी 15% कर अशी वाढ करून शुल्क आकारले जावे असे निश्चित करण्यात आले आहे तरी सुद्धा हे शुल्क 550₹ पर्यंत जाते परंतु तो शासन निर्णय सुद्धा या शासन कर्त्यांनी गुंडाळून ठेवला आहे.
त्याहून अधिक कडी म्हणजे मागासवर्गीय विध्यार्थी असेल जवळ जवळ 50%पर्यंत सूट असत पण त्या विध्यार्थीचे सुद्धा सुल्क वाढवून शासकीय तिजोरी भरून काढण्याचे काम हे सरकार करीत तरुण बेरोजगार विध्यार्थी च्या मजबुरीचा फायदा सरकार घेत असून ताबडतोब ही वाढीव शुल्क कपात करून बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा अशा अश्याचे निवेदन सोलापूर उप जिल्हा अधिकारी शमा पवार यांना रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया व रि पा ई अल्पसंख्यांक विभाग सोलापूर च्या वतीने देण्यात आले या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष सुबोधवाघमोडे माणिक आठवले रावसाहेब परीक्षाळे मारुती सोनवणे धर्मा माने सलीम मुल्ला सिकंदर शेख इम्रानशेख इब्राहिम शेख नसरीन शेख पूनम मोरे वंदना शेट्टी इत्यादी पदाधिकारी उपस्तित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment