सारा न्यूज नेटवर्क -
जीवनाआवश्यक वस्तूंच्या किमती कमी आणि स्थिर ठेवण्याची रिपाईची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खाद्य तेलाच्या किमती 20% ज्यादा दराने किंमत वाढवलेली आहे वास्तविक पाहता सणासुदीच्या विचार करता ह्या किमती वाढवणे सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला परवडणारे नाही आता सध्याला सुद्धा गेल्या वर्षभरापासून शेंगा असेल किंवा इतर वस्तू असेल त्याच्या किमती शंभर रुपयाच्या पुढे पल्ला गाठलेला आहे तेव्हा अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा सरकारने वीस टक्के जादा रकमेने किमती वाढवल्या ही बाब निषेधार्थ आहे.
वास्तविक पाहता सध्याच्या काळामध्ये सरकारच्या वतीने लाडक्या बहिणीचे कौतुक केले जात आहे ही खरोखर महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक आहे एकीकडे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करायची तिच्याच भावाकडून त्यांच्यात घरातून अशा पद्धतीने महागाई वाढवून किंमत जास्त आकारून पैसे लुटायचे हा म्हणजे शुद्ध फसवणुकीचा खेळ आहे सणासुदीच्या काळामध्ये रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पर्यंत आपल्या हाताच्या जोरावर पोटाची खळगी भरली जाणारे मजूर कष्टकरी जनता जेव्हा कमवावे हातामध्ये दाम मिळेल तेव्हा घराचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो आणि अशा परिस्थितीमध्ये सण समोर येऊन जर या वस्तूच्या किमती वाढविले आहेत असे होत असेल तर सर्वसामान्य जनतेने व गोरगरिबांनी सन कसे साजरा करावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे तेव्हा सरकारने ताबडतोब या किमती कमी करून त्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा या महाराष्ट्रातले गरीब जनतेला जगणे अवघड जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द करून तेलासह सर्व जीवनावश्यक वस्तू च्या किमती कमी कराव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आलेले आहे
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुबोध जी वाघमोडे मारुती सोनवणे मेजर साबळे सलीम मुल्ला इब्राहिम शेख इमरान शेख सिकंदर शेख इरफान कल्याणी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment