सारा न्यूज नेटवर्क -
वडिलांसह एकाच कुटूंबातील तीन मुले तडीपार
साेलापूर (प्रतिनिधी ) :- शहरात गुन्हे करणार्या वडिलांसह तीन मुलांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.
या टोळीतील
*संतोष दत्तात्रय भिंगारे* (वय ५४),
*ऋतिक संतोष भिंगारे* (वय ३२)
*यश संतोष भिंगारे*(वय २१)
आणि *तुषार संतोष भिंगारे* (वय २२,)
सर्व रा.घर नंबर 73, पश्चिम मंगळवार पेठ, काशी कापडी गल्ली सोलापुर)
अशी तडीपार करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
या चौघांविरुद्ध सन २०२०, २०२१ आणि २०२४ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा व मारामारी करणे, घातक शस्त्रासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल होते.
त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
यावर पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कारवाई करून चौघांनाही सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
त्यांना तडीपार केल्यानंतर अहमदनगर येथे सोडण्यात आले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment