सारा न्यूज नेटवर्क -
सेंट्रल टेक्स्टाईल मिल,आगीच्या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा.
- विष्णू कारमपुरी (महाराज )
एम.आय.डी.सी. साठी असलेल्या, कायद्याचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा..
महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि.१८ मे २०२५ रोजी पहाटे घडलेल्या आगीच्या तांडवात, सेंट्रल टेक्सटाईल मिल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत, मालक व कामगार कुटुंबीय दुर्दैवी मृत्यू पावले त्या आठ जणांना आत्माशांती लाभण्यासाठी, संबंधित आगीस कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करा., तसेच मन्सूर व बागवान कुटुंबियांतील मृत्यू पावलेल्या प्रत्येकी २५ लाख रुपये मदत करावी., अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात एकूण १० मागण्यांचा समावेश करण्यात आला., आणि भविष्यात अशे गंभीर प्रकार घडू नये यासाठी पूर्व दक्षता घेण्याचे या मागण्यांमध्ये समावेश आहे.
१. या आगीत अग्निशामक दलाचे जवान देखील जखमी झाले, सदर आग विझवताना अनेक अडचणी आल्याचे ते सांगतात.
2. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला आलेल्या अडचणीच्या अहवालाप्रमाणे प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
3. अग्निशामक दलाचे केंद्र निर्माण करण्यासाठी अनेक वर्षापासून कारखानदारांची मागणी आहे तरी अग्निशामक दल केंद्राची निर्मिती करावी .
4. कारखाने निरीक्षक अधिकारी हे अनेक वर्ष कारखान्याची पाहणी करत नाहीत, केवळ असे काही प्रकार घडले असते यावेळी उपस्थित राहतात., म्हणून कारखाना निरीक्षक अधिकारी यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी.
5. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला तारेची कसरत करावी लागते., याबाबत आलेल्या अडचणींचा देखील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश द्यावे.
6. आग लागण्याचे कारण अद्यापही समजले नाही., तरी आगीच्या कारणाचा शोध लावावा.
7. सोलापूर महानगरपालिका औद्योगिक विकास महामंडळ इंडस्ट्रियल असोसिएशन आणि संबंधित विभागांच्या सर्व अधिकाऱ्यांचे कारखानदारासह दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात यावी.
8. अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी विद्युत उपकेंद्र केवळ एकच आहे त्यांची संख्या वाढवावी.
9. सेंट्रल कारखान्याला लागलेली आग विझवण्यासाठी त्यात बांधलेल्या मशिदीमुळे अडचण निर्माण झाल्याची प्रसिद्धी माध्यमातून कळते याच्या खऱ्या माहितीचा शोध घ्यावा.
10. या आगिस व झालेल्या आठ जणांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा.
तरी माननीयांनी वरील सर्व मागण्याची गंभीर पणे दखल घेऊन, योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, सविता दासरी, लक्ष्मी गुंटला, महालक्ष्मी शेरला, पद्मा मॅकल, राणी दासरी, कविता शेरला, लक्ष्मीबाई मालपुरी, प्रसाद जगताप यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment