Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 14, 2023

निर्भीड व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार प्राप्त युवराज मोरे यांची संत रोहिदास विकास फांउडेशनच्या "महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष"पदी निवड




पुणे-चर्मकार समाजातील विविध क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक,राजकीय,पत्रकारिता क्षेत्रातील कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित नावामध्ये ओळख निर्माण केलेल्या मा. युवराज मोरे यांची संत रोहिदास विकास फांउडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संत रोहिदास विकास फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुरेखाताई दिघे यांनी संत रोहिदास विकास फांउडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड केलेली पत्र दिले.

श्री. युवराज मोरे हे गेली पंधरा वर्षे झाली सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात संत रोहिदास चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे ते सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले.त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ आणि जनसंपर्क पाहून संघटनेने त्यांना राज्य संघटक,जिल्हाध्यक्ष व पुढे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली ती त्यांनी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे सांभाळली तथा आपल्या पदाला न्याय देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.समाजातील कोणत्याही प्रकारची वैयक्तिक पातळीवर असो सामाजिक अडचणी ते तात्काळ उपलब्ध राहून त्यातून मार्ग काढण्यात त्यांचा मोठा हातखंडा आजही कायम आहे. अन्याय, अत्याचार झालेल्या समाजातील घटकाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत माघार घेणे कधीच पसंत केले नाही.


शैक्षणिक बाबतीत शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना जातीचे दाखले,उत्पन्नाचे दाखले, समाजकल्याण विभागाकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती, अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अशा अनेक बाबतीत न्याय दिला. अनुसूचित जातींसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले यामध्ये रमाई घरकुल योजना,विहीर मंजुरी,शेतीला लागणारे साहित्य,औजारे,औषध फवारणी पंप,पाईपलाईन, वीज जोडणी यासारख्या अनेक कार्यातून शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या बांधवांना मिनी ट्रँक्टर उपलब्ध करून सहकार्य केले.जेष्ठ नागरिकांना,विधवा, परित्यक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून महिना पेन्शन योजना मंजूर करून आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकार्य केले.गर्भवती महिलांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सहकार्य करत शासकीय मदत उपलब्ध करून दिली.अपघातग्रस्त ठिकाणी एँब्मुलन्स उपलब्ध करून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत शेकडो लोकांना सहकार्य केले.

2019 आणि 2021मध्ये अतिवृष्टीने आलेल्या महापुरात अनेक कुटूंबावर संकट कोसळले होते अशावेळी अन्न-धान्य,जेवण वाटप,जीवनावश्यक वस्तू, औषधे वाटप करण्यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.कोरोनासारख्या महाभयंकर महामारीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले.अनेक रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली.एवढेच नाही तर कोरोनामध्ये दगावलेल्या रुग्णांना शववाहिका उपलब्ध करून पेशंटचे अंतिम कार्य करण्या

No comments:

Post a Comment