सारा न्यूज नेटवर्क -
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व सत्कार संपन्न...
सोलापूर (प्रतिनिधी) : - क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी मधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, हा कार्यक्रम श्री गीता मंदिर देवस्थान ट्रस्ट लोकसेवा हायस्कूल सोलापूर येथे करण्यात आला.
यावेळेस कार्यक्रमासाठी माजी क्रीडा राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सेवानिवृत्त पीएसआय अनिल उकरंडे, वीरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्षा संगीताताई बिराजदार, निवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे मॅडम, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत (मेजर) उकरंडे ,क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे,सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी लोंढे, संगीताताई धडे, सामाजिक कार्यकर्ता रमेश कल्ले, रेश्मा धडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मा.क्रीडा राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, सेवानिवृत्त पीएसआय अनिल उकरंडे,मिनाक्षीताई पेठे, वीरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्षा संगीताताई बिराजदार,यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण करुन त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदर्श धडे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी उपस्थित मान्यवराचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment