Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, June 26, 2024

शाहू महाराजांनी 19 व्या शतकामध्ये देशात औधोगिक क्रांती केली. - सुबोध वाघमोडे



सारा न्यूज नेटवर्क - 

शाहू  महाराजांनी 19 व्या शतकामध्ये  देशात  औधोगिक  क्रांती केली. - सुबोध वाघमोडे

सोलापूर (प्रतिनिधी) :- भारत  हा उदयोगं प्रधान देश  झाला  पाहिजे छत्रपती शाहू  महाराजांनी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात काम मिळवून तो माणूस सुखी  होईल या भावनेने शाहू  महाराजांनी 1904 व 1905 मध्ये उदयोगं निर्माण केलेत्या वेळी त्यांनी सुगन्धी तेल चंदन  तेल कापडं गिरण्या सूत मिल शेत उत्पादन कारखने  काढले त्याची व्याप्ती हि कोल्हापूर शिवाय महराष्ट्र व संपूर्ण देशभर  वाढवली म्हणजे च देशात  पहिली  औदयोगिक क्रांती खरी शाहू  महाराजांनी केली याचाच  अर्थ महाराज हे दूर दृष्टीकोनी होते असे उदगार रिपाइचे  प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे  यांनी पक्ष  कार्यलय याठिकाणी जयंती निमित्त केले. 



शाहू महाराज  हे समतावादी  जातीभेद  विरुद्ध होते तसेच  मागासवर्गीय व दलितांना शिक्षण व नोकरी  मध्ये 50/टक्के आरक्षण निर्माण केले अशा  थोर  जाणता  राजाला अभिवादन करण्यात आले या वेळी जाक्कपा कांबळे माणिक आठवले  धर्मा  माने सागराज बिराजदार मेजर साबळे मारुती सोनवणे शिकदर  शेख  इम्रान शेख  इब्राहिम शेख  समिर  मुजावर इत्यादी प्रमुख  पदाधिकारी उपस्थित होते

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment