Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 29, 2024

भारताने T20 World Cup जिंकला.

 



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर :- सोलापूर नव्हे तर देशभरात दिवाळी शनिवारी मध्यरात्री साजरी झाली. निमित्त होते क्रिकेट जगतात भारत विश्व विजेता झाल्याचे.

भारताने 177 धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला. बार्बाडोसच्या मैदानात भारताने इतिहास रचला. 2007 नंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या, बुमराह आणि अर्शदीप यांनी शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्मा 2007 आणि 2024 विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. 

टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताने सात धावांनी साउथ आफ्रिकेवर विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात साउथ आफ्रिकेने चांगली पकड मिळवली होती पण भारताचा गोलंदाज बुमराह याने सामना फिरवला. शेवटच्या दोन ओव्हर मध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. भारताच्या संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवली आणि विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. हा सामना जिंकल्यावर भारतीय क्रिकेट टीम मधील सर्व खेळाडू भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले. याचा आनंद समस्त भारतीयांना झाला देशभरात नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. सोलापुरात ही क्रिकेट प्रेमींनी फटाके फोडून हा आनंद साजरा केला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment