सारा न्यूज नेटवर्क -
वक्फ बोर्ड रद्द करा, १० कोटीचा निधी रद्द करा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा : सुधीर बहिरवाडे
सोलापूर ( प्रतिनिधी ) :- हिंदुचे मंदिरे, घरे, जमिनी आज मुस्लिमांच्या ताब्यात गेलेले आहेत. वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे. वक्फ बोर्डच्या भारतात ३ नंबरच्या जागा आहेत. आज आपल्या सोलापूरातच साखर पेठ या भागात वक्फ बोर्डने कब्जा केल्यामुळे कितीतरी हिंदुचे जिवन उध्वस्त झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे. तो एक असा कायदा आहे मुस्लिम ज्या जागेवर हक्क सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते. त्या मुळे शासनाने एक तरी वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा.
१० कोटीचा निधी वक्फ बोर्डाला देणे म्हणजे हिंदु समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्या सारखे आहे. तरी वक्फ बोर्डाला दिलेला १० कोटीचा निधी रद्द करावा अन्यथा हिंदु महासभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिव्र आंदोलन करणार आहे. असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला.
हे निवेदन देतेवेळी सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, विशाल जाधव,राहुल येलमोटे,शुभम कराळे, प्रशांत पवार, अर्जुन मोहिते, ओकांर चव्हाण, विशाल पवार,सुरज भोसले, प्रसाद झेडगे, रोहित परदेशी, लतेश हिरवे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादि युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment