सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्कार देऊन सन्मान..
24 जुन 2024 प्रतिनिधी -
सांगली (वाळवा) : - संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज अखंड चर्मकार समाजाचे प्रेरणास्थान आहे, संत रोहिदास महाराज यांना अभिप्रित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्याचा वसा घेऊन महाराष्ट्र राज्य मध्ये "संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन" महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. दत्तात्रय आत्माराम कदम याच्या मार्गदर्शनाखाली युवा महासंघ फाऊंडेशन कार्यरत आहे. संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशन(अराजकीय संघटना) संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्मकार समाज बांधवाच्या न्याय हक्क, रोजगार, व्यवसाय, नोकरी आणि समाज प्रबोधन यासारख्या कामामध्ये हातभार लावत आहे,
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य चा पहिला "संत रविदास समाज भूषण" महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2024, हा कार्यक्रम दि. 23 जून 2024 रोजी सांगली तालुका वाळवा येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास महाराज व इतर सामाजिक थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिप प्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे सत्कार अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा दत्तात्रय कदम व उद्घाटक म्हणून देवप्पा शिंदे व सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड होते.
यावेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशन मार्फत समाजामध्ये समाज कार्य करणाऱ्या समाजबांधवाना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच फाऊंडेशनमधील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनच्या वतीने सातवी ते नववी तसेच दहावी,बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. यावेळी त्यांचा वह्या पुस्तके देवून सत्कार करण्यात आला व काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळविले आहे त्यांचाही सुद्धा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समाजभूषण पुरस्कार हा महराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अशा समाजबांधवांना देण्यात आला की, ज्यांनी समाजातील गरीब, पीडित, वंचित व गरजू लोकांना शासकीय,आर्थिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि त्यांच्या विविध अडचणी मध्ये मदत करण्याचे काम करत असतात अशा समाजबांधवांना त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक तसेच साहित्यिक अशा विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशने त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय "समाजभूषण पुरस्कार" व सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौवरण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सांगली जिल्हा टिम त्यांचे जिल्हाअध्यक्ष अरुण गायकवाड व महिला जिल्हाध्यक्ष संगीता शिंदे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी करुन दाखवला. त्या बद्दल संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी त्यांच्या मनोगतातून कौतुक केले व आभार मानले.
हा पुरस्कार सोहळा साजरा करण्यासाठी संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे हातभार लागले आहे, विशेष करून संस्थापक अध्यक्ष - दत्तात्रय आत्माराम कदम , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री देवप्पा शिंदे, महासचिव ज्ञानदेव कदम, संस्थापक सदस्य कैलास लोखंडे, प्रदेश युवक अध्यक्ष निशात भाऊ बुरूटे, किरण भाऊ बागडे, दत्ताभाऊ शिंदे, पच्छिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजयभाऊ शिंदे अमोल कांबळे यांनी परिश्रम घेतले.
प्रमूख पाहुणे
मा.श्री.गौरवभाऊ नायकवडी चेअरमन हुतात्मा दुध संघ
मा श्री.नेताजी पाटिल उपसभापती ता वाळवा, मा.श्री.संदेश कांबळे लोकनियुक्त सरपंच वाळवा
सुञसंचालन
मा.श्री.ज्ञानदेव कदम (महासचिव)
मा श्री.दत्ताभाऊ शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच आयोजन
मा.श्री.अरूण गायकवाड जिल्हाअध्यक्ष सांगली,
सौ संगिता शिंदे जिल्हाध्यक्षा सांगली, पांडुरंग कारंडे, परशुराम माने, अमोल गायकवाड, सुरेश गायकवाड, गणेश लोकरे, विशाल गायकवाड, गणपत शिंदे व सांगली टिम सर्व पदाधिकारी यांनी खुप चांगल्या प्रकारे केले.
आभार प्रदर्शन दादासाहेब माने, कुमार माने केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment