सारा न्यूज नेटवर्क -
तिरडीच्या काठयांचा वृक्षारोपणासाठी केला वापर....
अभिनव उपक्रमाची परिसरात चर्चा : अंधश्रद्धा सोडून निसर्गाची पूजा....
सोलापूर (प्रतिनिधी) :- अंधश्रद्धांना मातीना गाडून निसर्ग प्रतिच्या श्रद्धेचे करण्यासाठी काम अनेक निसर्ग प्रेमी करीत असतात.
बाळे येथील एका अशाच निसर्गप्रेमी चक्क मृतदेहाचा तिरडीच्या टाकून दिलेल्या काट्यांचा वापर वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या आधारासाठी करण्याचा उपक्रम राबविला आहे..
निसर्गाला सोबत मानून त्यांच्या संवर्धसाठी झटणारे फार कमी आहेत. बाळे येथील राहणाऱ्या निसर्गप्रेमी दीपक करकी यांनी अशीच चळवळ सुरू केली आहे. यांनी मृतदेहाच्या तिरडीच्या काट्यांचा वापर करून आठ झाडांचे वृक्षारोपण केले आहे. यामध्ये चार लिंबाची आणि चार करंज झाडाचे वृक्षारोपण केले आहे. या झाडाला दररोज पाणी घालण्याचे काम एकत्व सोशल फाउंडेशन बाळे सदस्य चेतन झाडे हे करत आहेत.
एके दिवशी रविवारी दीपक करकी यांनी पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी उत्तर सोलापूर येथील खेड या गावांमध्ये स्मशानभूमीत येथे एका पिंपळाच्या झाडाला मातीचे भांडी पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी गेले असता त्यांना स्मशानभूमी शेजारी मृतदेहाचा तिरडीच्या काट्यांचा खच पडलेला दिसला या काट्यांचा वापर वृक्षारोपण केले. आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाड वाकलेपडले होते. झाडांच्या आधारासाठी केले जाऊ शकतो. असे सुचले त्यामुळे त्यांनी त्यातील त्या काट्यांचा अनेक परिसरात काठीचा आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.
🔳 स्मशानभूमीत अंत्यविधीला गेलेला माणूस घरी हात पाय धूऊन आलेला चालतो, मात्र स्मशानभूमीतील एखाद्या गोष्टी घरी आणली की माणसाला ती चालत नाही मृतदेहाच्या तिरडीच्या काठया अनेक गोष्टीसाठी वापरतात येतात आम्ही त्याचा वापर वृक्षारोपणासाठी आधार देण्यासाठी केला आहे..
दीपक करकी - निसर्गप्रेमी बाळे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment