सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा.,
'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे' पालकमंत्र्यांना निवेदन...
सोलापूर (प्रतिनिधी) :- 'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने', सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा., अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांना समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने, गेल्या दोन महिन्यापासून सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता अभियान, या संदर्भात झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबविण्यात आले., त्यावेळी झोपडपट्ट्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर व प्रदूषित रोगराई प्रसरण्यास मुख्य कारण असल्याचे समोर आले., याच कारणाने जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये, दोन चिमुकल्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला., याचे मुख्य कारण म्हणजे झोपडपट्टीतील प्रदूषित वातावरण हे होते, यात शंका नाही.,म्हणून सोलापुरातील जनजीवन निरोगी सदृढ राहण्यासाठी, सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
करण्याची अत्यंत गरज आहे., त्याचबरोबर स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, ड्रेनेज लाईन व पाण्याचे पाईपलाईन एकत्रित असल्याचे महापालिका अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहीर केले आहे., आणि इतर नागरी सुविधांचा व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी, सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मा.पालकमंत्री साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, प्रसाद जगताप, पप्पू शेख, रमेश चिलबेरी, श्रीनिवास बोगा , गुरुनाथ कोळी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, राणी दासरी यांचा समावेश होता.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment