सारा न्यूज नेटवर्क -
लाखों रुपयांची बोगस बिले घेणाऱ्या परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्रावर कारवाई होण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांच्या बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात.
सोलापूर (प्रतिनिधी ) :- गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोक कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .
महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्यसरकार कडून अनुदान दिले जाते.
परिमंडळ कार्यालय अ विभागात चार शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे त्याच बरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे सदरची बाब अतिशय गंभीर असून शिव भोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फसणारी आहे सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी व कारवाई बाबत परिमंडळ अधिकाऱ्यांचा
अंकुश नसून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटी बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 28/3/2025 रोजी अन्न धान्यवितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्या कडे लेखी तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती त्याच बरोबर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता
सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत
अश्या शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे.
परिमंडळ अ विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या त्रुटी व दोष आहेत.
राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्रचालक थाळीची बोगस संख्या वाढवून लाखो रुपये बिले घेऊन राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारण्याचे काम काही वर्षांपासून करत असून अश्या शिवभोजन केंद्र चालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय तक्रारी ची देखील दखल घेतली जात नाही परिमंडळ कार्यालय अ विभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणी साठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार,सारा न्यूज संपादक राम हुंडारे , साप्ताहिक महादरबार संपादक हनुमंत माने ,जेष्ठ पत्रकार अरुण सिडगीद्दी इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते. गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोक कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .
महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्यसरकार कडून अनुदान दिले जाते.
परिमंडळ कार्यालय अ विभागात चार शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे त्याच बरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे सदरची बाब अतिशय गंभीर असून शिव भोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फसणारी आहे सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी व कारवाई बाबत परिमंडळ अधिकाऱ्यांचा
अंकुश नसून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटी बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 28/3/2025 रोजी अन्न धान्यवितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्या कडे लेखी तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती त्याच बरोबर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता
सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत
अश्या शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे.
परिमंडळ अ विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या त्रुटी व दोष आहेत.
राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्रचालक थाळीची बोगस संख्या वाढवून लाखो रुपये बिले घेऊन राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारण्याचे काम काही वर्षांपासून करत असून अश्या शिवभोजन केंद्र चालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय तक्रारी ची देखील दखल घेतली जात नाही परिमंडळ कार्यालय अ विभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणी साठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार,सारा न्यूज संपादक राम हुंडारे , साप्ताहिक महादरबार संपादक हनुमंत माने ,जेष्ठ पत्रकार अरुण सिडगीद्दी इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment