सारा न्यूज नेटवर्क -
गटई कामगारांच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन चर्मकार युनियनचे जिल्हाध्यक्ष बळीराम इंगळे यांचे "आमरण उपोषण"
संत रविदास चर्मकार युवा महासंघाचा पाठिंबा जाहीर.
जिल्हाध्यक्ष बळीराम इंगळे यांची प्रकृती खालावली...
मिराभाईंदर (प्रतिनिधी) :- संस्थापक अध्यक्ष श्री.देवेंद्र शेलेकर यांच्या आदेशाने व प्रदेशअध्यक्ष श्री. सुभाष शिखरे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन चर्मकार युनियन मार्फत दि. १५/०१/२०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजल्यापासून मिरा-भाईंदर शहरातील सर्व गटई कामगार बंद पाळुन त्यांच्या विविध मागण्यांसाठी युनियनचे जिल्हाअध्यक्ष श्री. बळीराम शामराव इंगळे हे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान लगत भाईंदर-पश्चिम येथे जो पर्यंत त्यांच्या खालील मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत "आमरण उपोषणास" बसले आहेत.
प्रमुख मागण्या-:
१. प्रत्येक गटई कामगाराला मिरा-भाईंदर शहरात नविन गटई स्टॉलला परवानगी व मिळकत पावती कित्येक वर्षापासुन सध्या बसत असलेल्या त्याच जागी मिळाली पाहिजे.
२. नुतणीकरण पध्दत बंद करून पुर्वी प्रमाणे मिळकत पावती भाडे स्वरूपात देण्यात यावी.
३. संत शिरोमणी रविदास महाराजांचे भवन मिरा-भाईंदर शहरात शासनामार्फत उभे राहिलेच पाहिजे.
४. मिरा-भाईंदर शहरात शासकीय जागेवर घरकुल योजना राबवुन गटई कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजे.
५. स्टॉल धोरण २०२४ मध्ये रोजगारासाठी अर्ज करणा-या गटई, अपंग व दुध विक्री स्टॉलला लॉटरी पध्दत बंद करून सर्व पात्र अर्जदारांना नवीन परवानगी व मिळकत पावती देण्यात यावी व नुकतीच म.न.पा.ने दुध विक्रीचे स्टॉल भाडे तत्वावर देण्यास काढले आहेत ते त्वरीत रद्द करून मिरा-भाईंदर म.न.पा. च्या अधिकारात नेहमी प्रमाणे ठेवावे.
संत रविदास चर्मकार युवा महासंघाचा पाठिंबा ..
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांनी गटई कामगारांच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन चर्मकार युनियन च्या आमरण उपोषणास संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment