सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास महाराजांची जयंती डीजे च्या तालावर नव्हे तर महाराजांच्या विचारांवर साजरी झाली पाहिजे;
-- दत्ताभाऊ कदम, संस्थापक अध्यक्ष "संत रविदास चर्मकार युवा महासंघ"
पुणे (प्रतिनिधी) :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ आत्माराम कदम यांनी तमाम चर्मकार समाज बांधव आणि भगिनींना आवाहन केले आहे की, दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ वार बुधवार रोजी संत गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, संत रविदास महाराजांची जयंती डीजे च्या तालावर नव्हे तर महाराजांच्या विचारांवर, त्यांच्या कामावर आधारित व्याख्यानमाला सांप्रदायिक, परंपरेनुसार साजरी झाली पाहिजे, प्रबोधन म्हणजे महाराजांचे विचार आपल्या मध्ये प्रेरित झाले पाहिजे, जयंतीच्या दिवशी महाराजांच्या विचारांचा आदर केला पाहिजे,
मन चंगा तो कटोती मे गंगा...! गुरु रविदास महाराजांनी म्हटले होते कि, ऐसा चाहू राज मै जहा मिले सबन को अन्न छोट बडो सम बैसे रविदास रहे प्रसन्न...! याच मनी प्रमाणे या पृथ्वीतलावरील प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक जण समाधानी झाला पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी असला पाहिजे. गुरु रविदास महाराज हे समता बंधुता मानवतावादी व विज्ञानवादी विचारांचे संत म्हणून गुरु रविदास महाराज यांच्याकडे पाहिलं जातं गेली 648 वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते आजही समाजाने जिवंत ठेवण्याचे काम समाजाने केलं आहे आणि प्रत्येक घराघरांमध्ये हे विचार पोहोचले पाहिजेत याच्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 मध्ये दिल्ली येथे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी केली होती आणि या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु रविदास महाराज यांना अनटचेबल हा महत्त्वाचा ग्रंथ गुरु रविदास महाराज यांना अर्पण केला आहे.
क्रांतिकारी मानवतावादी विज्ञानवादी विचारवंत गुरु रविदास महाराज यांचे विचार आजही एक प्रेरणादायी विचार म्हणून समाजामध्ये ठाम आहेत जातीयवादाच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस पावले उचलली आणि समाजामध्ये एकता निर्माण व्हावी यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले.
जाति जाति में जाति है, जो केतन के पात, रैदास मनुष ना जुड सके जब तक जाति न जात...! याचप्रमाणे माणूस देखील जातीजातीमध्ये वाटला गेला आहे आणि जातीमध्ये वाटल्यामुळे एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होत आहेत आणि त्यासाठी माणसाने जाती-जातीमध्ये न वाटता एक मनुष्य हीच जात आहे असे गुरु रविदास महाराज यांनी सांगितले.
जय रविदास.! जय भीम जय..! शिवराय...!
श्री दत्ताभाऊ आत्माराम कदम
संस्थापक अध्यक्ष - संत रविदास चर्मकार युवा महासंघ
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment