सारा न्यूज नेटवर्क -
भारत मातेच्या भाळवरील जातीयतेचा कलंक दूर करा
भारतीय जात शपथग्रहण सोहळ्यास सिने अभिनेते प्रमोद सरवदे,सिने अभिनेत्री स्वाती मोरे,जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी) :-आज देशात जाती जातीत कलह होऊन जातीयतेच्या नावावर माणसामाणसात अत्याचार वाढत आहेत विशेषतः महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन महिलेची सुरक्षा धोक्यात आली आहे. यामुळे सत्ताधीशांनी याचा गंभीर विचार करून भारत मातेच्या भाळावरील जो जातीयतेचा कलंक लागला आहे तो कलंक दूर करा व हजारो जाती नष्ट करून मी प्रथम भारतीय आहे आणि अंतीमही भारतीयच आहे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वांनी अमलात आणल्यास खऱ्या अर्थाने भारत देश जातीमुकत व वैभवशाली होईल असे आवाहन अ.भा.प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी केले. अ.भा प्रबुद्धनाट्य परिषद आयोजित प्रबुद्ध रंगभूमीच्या, भारतीय जात आंदोलन कार्यक्रमात ते बोलत होते.
मनुवादी म्हणतात, जी जात नाही ती जात, तर संविधानवादी म्हणतात जाते ती जात. डॉ. आंबेडकरांच्या संकेल्पनेतील जाती विरहित समाजाच्या निर्मितीसाठी सर्व भारतीय जनतेने पुढे यावे कुणाचा धर्म वौद्ध असेल कुणाचा हिंदू, सिख, इसाई, जैन, इस्लाम, अनेकांचे अनेक जरी धर्म असतील तरी सर्वांनी आपली जात भारतीय लावावी असे आवाहन करून डॉ. गायकवाड यांनी ततागथ बुद्ध छ. शिवबा महात्मा ज्योतिबा फ ले क्रांतीबा बसवण्णा छ. शाहू महाराज संत रोहिदास संत तुकोबा व गाडगे महाराज या सर्व महापुरुषांच्या विचार सरणीतील असा जातीमुक्त भारत घडवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरवात प्रबुद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष कल्याण श्रावस्ती यांनी प्रास्ताविकेत जातीमुक्त भारतासाठी काय करावे हे सांगून भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या जातिमुक्त भारताच्या संकल्पने विषयी व प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळी विषयी माहिती कथन केली. या समारंभात डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी उपस्थित कलावंत कार्यकर्ते यांना भारतीय जातीची शपथ दिली.
"मी माझ्या मनातील पारंपारिक जात जाळीत आहे मी आजपासून भारतीय जातीचा मनोमन स्वीकार करीत आहे मला जर कोणी माझी जात विचारली तर मी माझी जात भारतीय जात सांगेन" असा निर्धार आपल्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांनी केला.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते प्रमोद सरवदे, सिने अभिनेत्री स्वाती मोरे, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, सेवा निवृत्त बँक अधिकारी अशोक साबळे, छ. शिवाजी मुस्लिम ब्रिगेड चे अध्यक्ष फारुख शेख, निसर्गोपचार तज्ञ डॉ. अनिता गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे मल्लिकार्जुन हिरेमठ, आरोग्य सल्लागार सुरेश शिवशरण, रेखा रोकडे, अभिनेते टेक्सास शिवशरण, आदी मान्यवर उपस्थित होते.
१२ मार्च २०२५ रोजी भारतीय जात आंदोलनाचा ३४ वा वर्धापनदिन समारंभ सोलापूर येथे संपन्न झाला. सर्व कलावंत कार्यकत्यांची आपल्या प्राणप्रिय भारताला जातीयतेच्या विळख्यातून मुक्त करण्याचा, भारताला वैभवशाली बनवण्याचा, आणि भारतीय संविधानाला बळकटी देण्याचा संकल्प केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment